वार्ताहर-मच्छे
मच्छे येथील श्री मच्छिंद्रदेवी कल्याणी (तलाव) रविवार दि. 12 रोजी सायंकाळी गावामध्ये प्रथमच गंगापूजेचे व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. हा पूजन सोहळा रामनाथ नाईक विश्वभारती विभाग संयोजक राष्ट्रीय स्वयंसेवकच्या नेतृत्वाखाली आणि सर्व गतीविधीच्या (संघटनेच्या) सहकार्याने पार पाडण्यात आला.
तलावपूजन करताना रामनाथ नाईक म्हणाले की, दररोज संध्याकाळी भारतातील हरिद्वार, ऋषिकेश आणि वाराणसी या तीन पवित्र शहरांमध्ये गंगा आरती केली जाते. हा एक अतिशय शक्तिशाली आणि उत्थान करणारा आध्यात्मिक विधी आहे. आरती ही एक भक्तीविधी आहे. जी अर्पण म्हणून अग्नीचा वापर करते. हे सहसा पेटलेल्या दिव्याच्या रूपात बनवले जाते आणि गंगा नदीच्या बाबतीत, मेणबत्ती आणि फुलांसह एक छोटा दिया जो नदीत तरंगतो. गंगादेवीला अर्पण केले जाते. असाच उपक्रम आपण या गावात केला, हे कौतुकपात्र आहे.
यानंतर दीपपूजन करून महाआरती करून तलावप्मध्ये दीप सोडण्यात आले. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वाणी रमेश, बसवराज गाणगी, सुजित अनगोळकर, बेळगाव पर्यावरण गतीविधी विभाग, सर्व संघटना, महिला, युवती, युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.