राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा
पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या दोघांनीही गोमंतकीय जनतेला आज 30 मे रोजीच्या गोवा घटकराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनीही संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, 30 मे 1987 रोजी गोव्याचे केंद्रशासित प्रदेशातून भारतीय संघराज्यातील घटकराज्यात रूपांतर झाले. गोव्याच्या गौरवशाली इतिहासातील ‘घटकराज्य दिन’ हा संस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी 1987 मध्ये गोवा भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले. गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या इतर भागातील लोकांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आणि म्हणूनच याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी, आपल्या राज्याचे भाग्य घडविण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या असंख्य गोमंतकीयांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करूया. त्यांच्या उत्कृष्टतेचा, नाविन्यपूर्णतेचा आणि कऊणेचा वारसा पुढे नेत त्यांच्या दूरदृष्टीचा, त्यागाचा आणि चिकाटीचा सन्मान करूया, असे राज्यपालांनी म्हटले आहे. गोव्याने गेल्या दशकांमध्ये विशेषत: शिक्षण, आरोग्य सेवा, विकास, पायाभूत सुविधा इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गोवा ही शांतताप्रिय भूमी आहे आणि ही समृद्ध परंपरा कायम ठेवण्याचे श्रेय लोकांना जाते. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने राज्याला निरोगी लोकशाही परंपरेचा वारसा लाभला आहे. जगातील विविध भागातून लोक येथे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक गुण पाहण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी येतात. आपण हे सर्व मूळ गुण जपले पाहिजेत आणि आपल्या पर्यटकांचा मुक्काम आनंददायी, आणि संस्मरणीय बनविला पाहिजे. राज्यात नैतिकतेच्या धर्तीवर पर्यटनाची प्रगती होईल याची आपण खात्री करून घेतली पाहिजे, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.
गोव्याची ओळख जपणारा दिवस : मुख्यमंत्री
आपल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, 1967 मध्ये ‘ओपिनियन पोल’ने घटकराज्य प्रवासास सुऊवात झाली, ज्याने गोवा हे वेगळे राज्य म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. 30 मे हा गोव्याच्या गौरवशाली राजकीय इतिहासातील संस्मरणीय दिवस आहे, याच दिनी 1987 मध्ये गोवा हे भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले. हा दिवस गोमंतकीयांनी आपली ओळख जपण्यासाठी केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणतात, गोवा ही निसर्गसौंदर्य आणि प्रसन्न मनाच्या लोकांची भूमी आहे. राज्य अनेक क्षेत्रात भारताच्या विकासाचा मार्ग समृद्ध करीत आहे. राज्य संधींनी परिपूर्ण आहे आणि त्याची सर्व दिशांनी भरभराट होत आहे. लोकांचे समर्पण आणि योगदान यामुळेच गोव्याला राज्य सरकारद्वारे सुरू केलेले आणि राबविण्यात येत असलेले विविध विकासात्मक प्रकल्प आणि कार्यक्रम साध्य करणे शक्य झाले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्यांनी योगदान दिले ते सर्व नेते, विचारवंत आणि गोव्यातील जनतेचे आपण स्मरण करूया आणि नतमस्तक होऊया. गोव्याला ’स्वयंपूर्ण’ बनविण्याचा आणि सर्व क्षेत्रात स्वावलंबी पद्धतीने प्रगती आणि विकास साधण्याचा आपण संकल्प करूया, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.