पणजी : यंदाच्या गणेशचतुर्थीला उत्साहात सुरुवात झाली असून, काल (बुधवारी) रात्री राज्यातील दीड दिवशीय गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यातील विविध ठिकाणी घरगुती दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोविड महामारीनंतर यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गणेशउत्सव साजरा करण्याला अखंडित परंपरा असल्याने या उत्सवात राज्यातील भाविक गुण्यागोविंदाने एकत्र येत साजरा करतात. राज्याबाहेर असलेले चाकरमानी बांधव आपापल्या घरी परतून त्यांनी भक्तिभावाने गणेशपूजा केली. रात्री उशिरापर्यंत टाळ-मृदूंग व इतर यंत्राच्या साहाय्याने अनेक कुटुंबियांनी श्री गणेशाची मिरवणूक काढली. या मिरवणुकीदरम्यान अबाल वृद्ध व महिलांनी सहभागी होऊन गणेश मिरवणूक काढली. त्यानंतर विसर्जनस्थळी मूर्ती आल्यानंतर त्यांचे थाटात विसर्जन करण्यात आले. पणजीतील मिरामार किनारी, सांताक्रुज, ताळगाव, चारमानस तसेच मांडवी नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, सध्या दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले असले तरी पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अकरा, एकवीस दिवसीय गणेशमूर्तीची भक्तिभावाने सेवा केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे.
Previous Articleऐन चतुर्थीत पावसाने राज्याला झोडपले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment