प्रतिनिधी/ सातारा
प्रतापगडाच्या रणसंग्रामात शौर्य गाजवणारे शुर शिलेदार जिवाजी महाले यांची 363 वर्षानंतर प्रथमच किल्ले प्रतापगड येते प्रतिमेचे भव्य अनावर सोहळा संपन्न झाल्यामुळे शूरवीर जिवाजी महाले यांना व महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजाला आज ख्रया अर्थाने न्याय मिळाला
शासनाने भव्य पुतळा उभारावा अन्यथा महाराष्ट्रातील तमाम सकल नाभिक समाज बांधव स्वतःच्या स्वखर्चातून प्रतापगडावर पुतळा उभारतील तसेच महाराष्ट्रातील सकल स्वाभिमानी नाभिक समाजाला कोणत्याही खाजगी जागेमध्ये पुतळा नको आहे शासनाच्या आणि प्रतापगडावरच पुतळा हवा आहे अशी राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी किल्ले प्रतागडच्या प्रवेशद्वारा जवळ वीर जिवाजी महाले यांच्या भव्य प्रतिमा अनावरण प्रसंगी बोलताना उद्गार काढले.
शूरवीर जिवाजी महाले यांच्या यांच्या जयंतीचे अवचित साधून स्वाभिमानी नाभिक संघटना. महाराष्ट्र राज्य च्या वतीने सातारा ते प्रतापगड दुचाकी रँली चे भव्य आयोजन करण्यात आले होते या रँली साठी जिह्यातील अनेक गावातून नाभिक बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते ही दुचाकी रँली सातारा जिल्हा परिषद मैदान येथून श्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका वरच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद , प्रतापसिंह महाराजयांच्या पुतळ्याला अभिवादन करुन राजवाडा, ते पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार हार घालून अभिवादन करून रँली सातारा बस स्टँड मार्गे मेढा , कुडाळ, पाचवड. वाई, पाचगणी. महाबळेश्वर. मार्गाने जात असताना ठिकठिकाणी नाभिक समाज बांधवाच्या कडून रँली स्वागत करण्यात आले महाबळेश्वर येथे ओबीसी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले अतिशय शिस्तबद्ध रँली प्रतापगड प्रवेशद्वार जवळ पोहच्यानंतर त्या ठिकाणी स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचा बोर्ड उभारण्यात आला मोठय़ा संख्येने उपस्थित महाराष्ट्र सह सातारा जिह्यातील नाभिक समाज बांधवांच्या साक्षीने या प्रतिमेचे अनावरण राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना गायकवाड म्हणाले प्रतापगडाच्या रणसंग्रामात इतिहासात “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ” हे वाक्य छत्रपतींच्या मुखातून उद्गारले गेले आहे अश्या योद्धाचे स्मारक होणे गरजेचे आहे अजून पर्यंत या प्रतागडवर साधी प्रतिमा व नाव सुद्धा नसल्याने ही खुप मोठी शोकांतिका होती म्हणून आज स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे या प्रतिमेवरील लिहिलेला लेख सकल नाभिक मजला व शिवप्रेमी यांना प्रेरणा देणारा ठरेल असे भाषणात श्री गायकवाड यांनी सांगितले.
स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरॅलीचे आयोजन राज्य सरचिटणीस, मंगेश काशिद, सातारा जिल्हा अध्यक्ष अधिकराव चव्हाण केले सुत्रसंचलन प्रमोद पवार यांनी केले.
या जयंतीनिमित्त संघटनेचे,राज्य, पश्चिम महाराष्ट्र, जिल्हा , तालुका , शहर विभाग कार्यकारणीचे पदाधिकारी तसेच सातारा रायगड पुणे जिह्यासह महाराष्ट्रातील मोठय़ा संख्येने नाभिक बांधव उपस्थित होते