रत्नागिरी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री,रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री नामदार उदय सामंत हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यात सूरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला.
जिल्ह्यात काही ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे.तर एकीकडे काहीच कामचोर ठेकेदार काम घेवून ती कामे तशीच तात्कळात ठेवली आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणीत आहेत. यावेळेस कोटींचा निधी उपलब्ध असून यां कामात दिरंगाई करत असलेल्या अधिकारी ठेकेदार यांना पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी चांगलेच झापले असुन पाण्याचा प्रश्न उद्भवत असून युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.