Gujrat Election : आपल्या पहिल्याच रॅलीत सत्ताधारी भाजपवर (BJP) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी भाजपवर टिका करत आदिवासींनी जंगलात राहावे अशी भाजपची इच्छा आहे. असे ते म्हणाले. ते आज सुरतमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले की, आदिवासींनी शहरात राहून त्यांच्य़ा मुलांनी अभियंता व्हावे किंवा इंग्रजी बोलावे हे भाजपला नको आहे. आदिवासींना भारताचे खरे मालक आहेत असे संबोधून गांधी म्हणाले की, भाजप त्यांना “आदिवासी” ऐवजी “वनवासी” असे मानते.
खासदार राहूल गांधी पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान, त्यांना शेतकरी, बेरोजगार तरुण आणि आदिवासी समाजातील लोकांच्या व्यथा आणि वेदना जाणवल्या. ही यात्रा प्रेम, करुणा आणि बंधुत्वासाठी असून त्यात सर्व स्तरातील लोक सामील झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत राहूल गांधी यांचा हा दुसरा गुजरात दौरा असून ते राजकोट शहरात आणखी एका सभेला संबोधित करणार आहेत.
Previous Article‘भारत जोडो’ ही सत्तेसाठीची यात्रा- पंतप्रधान
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment