बाजारपेठेतील व्यापाऱयांसह दुचाकीस्वारांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली होती. बुधवारी रात्रीपासूनच उकाडय़ामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे गुरुवारी पाऊस होईल, अशी साऱयांचीच अपेक्षा होती. गुरुवारी सायं. 4.45 वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. यामुळे बाजारपेठेतील बैठय़ा व्यापाऱयांची आणि दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली.
गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने चित्ररथ देखाव्यांची मिरवणूक सुरू होती. मात्र या पावसामुळे मिरवणुकीमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचून होते. या पावसामुळे बाजारपेठेतील विपेते आणि खरेदीदारांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
यावषी मार्चपासूनच वळिवाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांमध्ये वळिवाचे चारहून अधिक पाऊस कोसळले आहेत. जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे तसेच हेस्कॉमचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने झाडेदेखील कोसळली आहेत. यावषी वळीव पावसाला जोर असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे शेतकऱयांना फटका बसला आहे.
पावसानंतर हवेत काहीवेळ गारवा निर्माण झाला तरी त्यानंतर पुन्हा उष्म्यामध्ये वाढ झाली होती. सध्या शहरामध्ये काही ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामे अर्धवट असल्याने त्या कामांच्या ठिकाणी पावसामुळे चिखल झाला होता. शहरासह उपनगरे तसेच ग्रामीण भागातही पाऊस झाला आहे.