रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत : दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस, दोडामार्ग : कोल्हापूर राज्यमार्गावर पाणीच पाणी
प्रतिनिधी / सावंतवाडी
सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचत असून रस्ते बंद होण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी तर पाण्याने प्रवाह बदलल्याने रस्त्यांच्या नद्या झालेल्या पहायला मिळत आहेत.
वेंगुर्ले कँम्प पाँवर हाऊस भागात पावसाने पूर स्थिती निर्माण होऊन भले मोठे आंब्याचे झाड मोडून रस्त्यावर पडल्याने तब्बल तीन तास वहातुक ठप्प झाली होती. तर सावंतवाडी शिरोडा मार्गावर मळेवाड सावरदेव नजीक रस्त्यावर पाणी वाहत असल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली.