विर्डी महाराष्ट्र भागात जोरदार वृष्टी. गोव्याच्या हद्दीत पाऊस कमीच
डिचोली/प्रतिनिधी
गोव्यात पावसाचा अलर्ट वेधशाळेने वर्तविला असला तरी प्रत्यक्षात मात्र राज्याच्या सीमाभागात जबरदस्त पावसाची वृष्टी सुरू आहे. त्यामुळे साखळीतील वाळवंटी व डिचोलीतील नद्यांची पातळी वाढली होती. अचानक नद्यांमधे वाढलेले पाणी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या विर्डी भागात तसेच वाघेरी भागातही जोरदार पाऊस पडल्याची माहिती मिळाली.
गोव्यात सध्या पावसाने उसंतच घेतलु आहे. अधुनमधून पावसाच्या सरी कोसळतान दिसतात. काही ठिकाणी तर जोरदार पावसाची बरसात पहायला मिळत आहे. परंतु गेल्या आठ दहा दिवसांमध्ये पावसाचा जोर बरच कमी झाल्याचे दिसून आले आहे. वेधशाळेने या दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्मयता वर्तवली होती. त्यादृष्टीने सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र तसा जोरदार पाऊस आतापर्यंत तरी पडलेला नाही.
साखळीतील वाळवंटी तसेच डिचोलीतील नदीलाही काल शनिवारी (दि. 6 ऑगस्ट) बरेच पाणी वाढले होते. साखळी भागात गेल्या 24 किंवा 48 तासात तसा चांगला जोरदार पाऊस झालाच नाही. आणि नदीला अचानकपणे पाणी वाढलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काहींनी केरी येथील अंजुणे धरणातील पाणी सोडले असल्याचाही अंदाज व्यक्त केला. परंतु धरणावरील अभियंता दिलीप गावकर यांच्याशी संपर्क साधला असता धरणाची पातळी अद्याप पाणी सोडण्या इतपत झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी रात्रभर विर्डी महाराष्ट्र भागात पावसाची जोरदार अविश्रांत बरसात झाल्याने वाळवंटी नदीला पाणी बरेच वाढले होते. विर्डी गावात पडणाऱया संपूर्ण पावसाचे पाणी हे थेट वाळवंटी नदीलाच मिळते आणि ते खाली साखळी विर्डीपर्यंत येते. त्यामुळे विर्डी महाराष्ट्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे साखळीत वाळवंटीची पातळी वाढल्याचे दिसून आले. परंतु सदर वाढलेल्या पातळीमुळे साखळीत पुराचा किंवा संबंधित स्थितीचा कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.
अंजुणे धरणात 88.40 मीटर पाणी
केरी येथील अंजुणे धरणातील पाण्याच्या पातळीत बरीच वाढ झली आहे. चोर्ला घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्याने या धरणात सध्या 88.40 मीटर पर्यंत पाणी भरले आहे. या धरणाची एकूण क्षमता 93.2 मीटर इतकी आहे. 90 मीटरच्या वर पातळी पोहोचल्यानंतर भविष्यातील पावसाचा अंदाज घेऊन धरणातील अतिरिक्त पाणी समोरील वाळवंटी नदीत सोडण्यात येते. त्यमुळे येत्या काही दिवसांतच या धरणाची पातळी 90 पार करण्याची शक्मयता आहे. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन पाणी समोरील नदीत सोडण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले.