शाहुवाडी प्रतिनिधी
ब्रिटिश कालीन असलेला १२५ वर्ष पूर्ण झालेला आणि आयुष्य मर्यादा संपून देखील अनेक अवजड वाहनांचा बोजा सहन करत. अखेरच्या घटका मोजत असलेल्या कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या. शाळी नदीवरील पुलाचे कठडे आता कोसळण्याच्या मार्गावर आली आहेत याकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न नागरिकांच्यातून पुढे येऊ लागला आहे .
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर शहराच्या प्रवेशद्वारावर शाळी नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल आणि 125 वर्षांपूर्वीपेक्षा अधिक वयोमर्यादा झालेल्या . या फुलाची आयुष्य मर्यादा संपल्याची सूचना देखील संबंधित विभागाबरोबरच मलकापूर नगर परिषदेला आली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे . गेले अनेक दिवस एक एक दगड निखळत होता तो दगड गायब झाल्याच्या ही घटना घडत होत्या .
आत्ता या पुलाच्या दोन्ही बाजूची पूर्ण पडझड होण्याच्या मार्गावर आली आहे . नेहमी रहदारी नागरिकांची गर्दी व ब्रिटिशकालीन पुलाची झालेली दुरावस्था कोण दूर करणार याची चर्चा नागरिकांच्यातून पुढे येऊ लागली आहे .
एकूणच कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील या ब्रिटिशकालीन पुलाची झालेली दयनीय अवस्था दूर होणार का आणि गेली 125 वर्षाहून अधिक काळ अविरतपणे सेवेत असलेल्या या पुलाचं हे विद्रुप रूप बदलणार का अशी संतप्त भावना नागरिकांच्यातून उमटू लागली आहे .