नदीची खोली-गाळ काढणे महत्त्वाचे : जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी, पावसाळ्यापूर्वी पात्रात खोदाई करण्याची गरज
बेळगाव : बेळगाव तालुक्मयातील उत्तर विभागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या मार्कंडेय नदीचा महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेतून जसा कायापालट करण्यात आला आहे. तसाच कायापालट आता हिरण्यकेशी नदीपात्राचा करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या उद्योग खात्री योजनेतून या कामाला चालना देणे गरजेचे आहे. तरी पावसाळ्यापूर्वी पात्रात खोदाई करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. नदीचे पात्र आता ऊंद होणार असून पाणीसाठा वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आता हिरण्यकेशी नदीपात्राचे पुन:श्चेतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. पाण्याचा वाढता धोका ओळखून या नदीपात्राचे ऊंदीकरण आणि खोलीकरण करण्यावर भर दिले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे बडकुंद्री ब्रिज, होळेम्मादेवी मंदिरापासून या कामाला सुऊवात झाल्यास सोयीचे ठरणार आहे. द•ाrपर्यंत हे काम केल्यास मोठा फायदा होणार आहे. 22 कि. मी. पर्यंत या नदीचे पात्र खोदाई करून ते स्वच्छ आणि पाणीसाठा वाढविण्यासाठीचे प्रयत्न करण्यावर भर दिला पाहिजे. मात्र सध्या पावसाळा तोंडावर असल्याने हे काम यावर्षी होईल की नाही? असा संशय आहे. जर या नदीचे पात्र वाढविण्यासाठी यापूर्वीच प्रयत्न झाले असते तर मोठा फायदा झाला असता. मात्र तसे झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना होणार फायदा
महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत या नदीच्या दोन्ही बाजूने खोदाई करण्यासाठी यापूर्वीच नियोजनाची गरज असते. या नदीचे सुमारे 22 कि. मी. पुनऊज्जिवन करायला हवे. याचबरोबर महाराष्ट्रातून जे पात्र आहे. तेथेही उद्योग खात्रीची जोड दिल्यास सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. प्रत्येकी कामाला 300 ऊपये वेतन देण्यात येत असून त्यात कुदळ आणि फावडा स्वत: कामगारच घेवून येत असल्याने त्यांना 10 ऊपये वाढवून देण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रवास खर्च म्हणून देखील वेतनात 10 टक्के पगार म्हणून वाढवून देण्यात येतो. एवढ्या सुविधा असल्या तरी अशी कामे जिल्हा पंचायत व तालुका पंचायत का हाती घेत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मध्यंतरी या नदीच्या पात्रात कामाला चालना देण्यात आली होती. मात्र मे अखेर या कामाला सुऊवात करण्यात आल्याने पावसामुळे हे काम रखडले होते. पुढील वर्षी या नदीच्या कामाला गती मिळेल, असे वाटले होते. मात्र त्याकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आल्याने ये-रे माझ्या मागाल्या, अशीच म्हणण्याची वेळ निर्माण झाली नाही.
नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल
सध्या मार्कंडेय नदीपात्राचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. याचबरोबर इतर कामांनाही चालना देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात या नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल, अशी अपेक्षा आहे. तशाच प्रकारे हिरण्यकेशी नदीचेही पात्र व खोली उद्योग खात्री योजनेतून वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पुनऊज्जीवनासाठी जोरदार प्रयत्न करण्याची गरज
पुनऊज्जिवन करण्यासाठी पात्रातूनही माती काढणे गरजेचे आहे. नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ असून नदीपात्राच्या काठावरून या कामांना सुऊवात केली पाहिजे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे याचा विचार करून पावसाळ्यानंतर या कामाला गती देण्याची गरज आहे. हिरण्यकेशीच्या पुनऊज्जीवनासाठी जोरदार प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे
उन्हाळ्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच या नदीचे पात्र कोरडे पडत होते. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत होता. जर या नदीच्या पात्रात खोदाई केल्यास पाणी साठ्यात वाढ होवून हे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांना लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून अधिकारीवर्गाने या नदीच्या दोन्ही बाजूने खोदाई करून त्याचे पात्र वाढविण्याचे काम तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. यामुळे नदीपात्रात पाणीसाठा वाढणार आहे. नदीपात्रात जेवढा पाणीसाठा राहील तेवढाच तो जमिनीत झिरपून नदीकाठीवरील विहिरीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होते. महाराष्ट्रातून उगम पावलेल्या हिरण्यकेशी नदीवर अनेक शेतकरी अवलंबून असतात. अनेक शेतकऱ्यांना ही नदी लाभदायी ठरते. नदीकाठी घेण्यात येणारी पिके ही या नदीच्या पाण्यावरच घेतली जातात. यामुळे उन्हाळी आणि हिवाळी पिकांनाही या नदीच्या पाण्याचाच पुरवठा केला जातो. त्यामुळे या नदीच्या पात्राची खोदाई व पुन:श्चेतन करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.