ऑनलाईन टीम/तरुण भारत
पावसाळ्यात धान्याची फार काळजी घ्यावी लागते. पावसाळा सुरु होण्या अगोदर अनेकजण घरात धान्य आणून ठेवतात. पण योग्य खबरदारी न घेतल्याने बऱ्याचदा हे धान्य खराब होते. कारण पावसाळ्यात पाण्यानं बुरशीनं धान्याला कीड लागण्याची शक्यता असते, धान्याला बुरशी किंवा कीड लागल्यानं ते खाण्यायोग्य राहत नाही. अशा प्रकारचं खराब अन्न खाल्ल्यामुळं व्यक्तीला विविध आजार होण्याची शक्यता असते.
धान्याला आपण लक्ष्मी मानतो. शेतकऱ्याला कापणीनंतर सगळे धान्य बाजारात विकेपर्यंत किंवा त्याला चांगली मागणी येईपर्यंत ते व्यवस्थित साठवून ठेवावे लागते. गृहिणींना देखील धान्याची वर्गवारी करून ते काही महिने किंवा वर्षभरही पुरेल आशा रीतीने सांभाळून साठवावे लागते. त्यामुळं पावसाळ्यात धान्याची कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊयात.
धान्य जास्त वेळ टिकण्यासाठी काय कराल?
पावसाळ्यात जास्त वेळ धान्य साठवण्यासाठी त्याआधी खरेदी करताना चांगल्या दर्जाचे धान्य खरेदी करायला हवे. त्यामुळं धान्य जास्त वेळ टिकेल. याशिवाय घरात धान्य आणल्यानंतर त्याला ज्या ठिकाणी ओलावा आहे त्या ठिकाणी ठेऊ नका.
धान्य खरेदी केल्यांनतर प्रथम घरी आणल्यावर ते कडक उन्हात वाळवून घेऊन मगच त्याला घरात स्टोर करावं. हवामान बदलामुळे धान्याला बुरशी लागून त्याला कीड लागण्याची शक्यता असते. त्यासाठी काही लोक त्यावर किटकनाशकाचा वापर करणं पसंत करतात. परंतु ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही कडुनिंबाच्या पानांचा वापर करू शकता.
धान्याच्या सुरक्षिततेसाठी किटकनाशकाऐवजी तुम्ही त्यात लवंग किंवा तेजपान टाकु शकता. गहू, तुर, हरभरा, उडीद, मुग आणि डाळीच्या सुरक्षिततेसाठी त्यात कडुनिंबाची पानं टाकायला हवी.
शिवाय धान्यांना मोहरी टाकल्यानंदेखील त्याला कीड लागल्यापासून संरक्षण करता येऊ शकतं.
त्याचबरोबर धान्याला बुरशी लागू नये म्हणून त्यात लसणाचाही वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. त्याचबरोबर ज्या पोत्यात किंवा डब्यात धान्य ठेवलं जाणार आहे त्यात आवश्यकतेनुसार लवंग आणि लसूण टाकायला हवं. याशिवाय धान्य घरात उंचीवर ठेवायला हवं
बऱ्याच वेळा घरामध्ये साठवलेल्या धान्याला बुरशी किंवा किडे होतात. ही समस्या बदलत्या हवामानामुळे देखील होते. त्यामुळे तुम्ही धान्यात लवंग किंवा तेजपान टाकु शकता.
बऱ्याचदा घरामध्ये आपणाला तुर, हरबरा, उदीड ,मुग आदी डाळी लागतात. पावसाळ्यात या डाळी घरी आणल्यास डाळी खराब होऊ नये यासाठी यामध्ये काही वाळलेली कडुनिंबाची टाकु शकता किंवा डाळींना मोहरीचे देखील घालू शकता. तेल लावल्यानंतर डाळीना एकदा उन्हात चांगले वाळवायचे आणि नंतर मग कंटेनरमध्ये भरुन ठेवा यामुळे आपली डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकू शकते.
धान्य खराब होऊ नये यासाठी धान्यामध्ये लसूण टाकु शकता. लसणामुळेदेखील धान्यांना कीड लागत नाही. त्यासाठी लसणाची सालं न काढता एक संपूर्ण गाठा धान्यामध्ये टाकावी.
डब्यामध्ये धान्य भरून ठेवत असल्यास एक काळजी घ्यायला हवी. आधी डबा चांगला पुसून घ्यावा नंतर डब्यात धान्य टाकावे त्यावर मग तुमच्या सोईनुसार लसून, लवंग जे उपलब्ध असेल ते टाकावे आणि त्यावर पुन्हा धान्य टाकले असे थरावर थर चढवुन डब्यात धान्याची साठवून करावी . जेणेकरून धान्याला कीड लागणार नाही.