सावंतवाडी प्रतिनिधी
विनायक राऊत यांचा पराभव अटळ; केसरकर यांचं मोठ विधान
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदारकीची निवडणूक लढणार नाही पण पक्षाने मला तशी विनंती केल्यास मी निश्चित निवडणूक लढवेन आणि माझे मित्र खासदार विनायक राऊत यांचा पराभव निश्चित करणार. महाभारतात श्रीकृष्णाने सांगितलं होतं युद्धात जरी आपला भाऊ समोर असला तरी त्याच्याशी युद्ध करायचा आणि त्याचा पराभव करायचाच आणि त्यानुसार जर पक्षाने मला आदेश दिले तर निश्चितच राऊत त्यांचा पराभव करणार असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. खरी शिवसेना कुठली आहे हे स्पष्ट झालेच आहे. पूर्वीच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानेच काय ते उत्तर दिले आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाला जनतेनेच विरोधी बाकावर बसवले होते आणि बसवले आहे. आणि आता ते विरोधी पक्षातच आहेत. ही चांगली गोष्ट आहे आणि ज्याने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगले आहे. त्यामुळे आताचे सरकार जनतेची कामे गावागावात करत आहे . भरघोस निधी देत आहे त्यामुळे हे सरकार जनतेचे आहे असेही ते म्हणाले.