बेळगाव : राज्यामध्ये मादिग समाज हा मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. हा समाज अत्यंत मागासलेला आहे. तेंव्हा या समाजाला सदाशिव आयोग लागू करावा, या मागणीसाठी बेंगळूर येथील फ्रिडम पार्कवर गेल्या 100 दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मादिग समाजाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून हा आयोग लागू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये ठराव करावा, अशी मागणी केली आहे. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही यासाठी आंदोलन करत आहे. मात्र प्रत्येक सरकारने आम्हाला केवळ आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असून तातडीने सदाशिव आयोग लागू करणे महत्त्वाचे आहे. मादिग समाज हा अत्यंत मागासलेला आहे. तसेच तो कमी शिकलेला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातही मागासलेला असून या समाजाला सरकारकडून मोठी मदत हवी आहे. निवृत्त न्यायमूर्ती सदाशिव यांनी या समाजाला आयोग लागू करण्याबाबत शिफारस केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी राज्य आणि केंद्र सरकारने केली नाही. त्यामुळे हा समाज अजूनही मागासलेलाच आहे. तेंव्हा तातडीने हा आयोग लागू करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बसवराज अरवळ्ळी, यल्लाप्पा हुदली, शंकर दोडमनी, तेदांत अनंतपूर, सुरजकुमार कोलकार यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.
Previous Articleबेकिनकेरे अर्धवट रस्त्याकडे दुर्लक्ष
Next Article अंगणवाडी सेविकांवर समीक्षा सर्व्हेचा बोजा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.