–कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध
–नितेश राणेंच्या वक्तव्यामध्ये तथ्य नाही
–राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी सुषमा अंधारे यांना पाठवले
Deepak Kesarkar : गेल्या तिन दिवसापूर्वी सांगोल्यात झालेल्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना नेहमीच या मार्गावर घडत असतात. असे अपघात होवू नयेत म्हणून दिंडी मार्गासाठी स्वतंत्र ट्रॅक उभा करावा अशी मागणी राज्यसरकारकडे करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. लवकरच सांगोला येथील अपघातातील वारकऱ्यांच्या मृताच्या नातेवाईकांची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अंबाबाई परिसर सुसज्ज करण्याचा मानस केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार , महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.
कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध
कोल्हापुरातील खड्डयांच्या प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, कोल्हापुरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे केले तर त्या ठेकेदारावर कारवाई केली जाणार आहे. तसेच जर अधिकारी काम करत नसतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या परिसरात पुराचे पाणी येते त्या ठिकाणी प्रशासकीय सेवा मिळत नाहीत त्याठिकाणी प्रशासकीय संकुले बांधले जाणार आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील 16 तालीम दुरुस्त करणार आहोत. कोल्हापूरच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. एनडीआरए अकॅडमी कोल्हापूरमध्ये होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
नितेश राणेंच्या वक्तव्यामध्ये तथ्य नाही
लव्ह जिहादविषयी बोलताना ते म्हणाले, प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या प्रकरणाला जादा महत्व देण्याची गरज नाही.पोलीसांनी याबाबत कायदेशीर कारवाई केली आहे. कोल्हापूरचे सामाजिक ऐक्य टिकले पाहिजे, ही कोल्हापूरचीही परंपरा आहे. आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहादबद्दल केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य नाही.पोलीस चांगल्या प्रकारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी सुषमा अंधारे यांना पाठवले
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, त्यामुळं खर बोलायला शिकल पाहिजे. राजकारणात जे चुकीचे होते ते मान्य देखील करायला शिकलं पाहिजे. काहीजण बोलताना संयम बाळगत नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्वांना संयमाने बोलण्याच्या सूचना केल्या आहेत. जे सूचनांचे पालन करत नाहीत, त्यांचे काय करायचे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. राष्ट्रवादीने याआधी देखील शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला आहे.आता देखील त्यांनी शिवसेना संपवण्यासाठी सुषमा अंधारे यांना पाठवले असेल. शिवसेनेच्या विरोधात सुषमा अंधारे काय बोलत होत्या? हे जनतेने ऐकले आहे असेही ते म्हणाले.