लंडन : भारताच्या बचावात्मक दृष्टिकोनामुळे निराश झालेले माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन सकारात्मक मानसिकता दाखवली नाही, असे मत व्यक्त केले आहे. भारताने अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला वगळले आणि अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत चार वेगवान गोलंदाजांना प्राधान्य देऊन ढगाळ वातावरणात गोलंदाजी करणे पसंत केले. पण ही चाल अंगलट येऊन शतकांची नोंद केलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी मोठी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. ‘जर मानसिकता सकारात्मक असती, तर प्रथम फलंदाजी करण्याची इच्छा बाळगली गेली असती, पहिले सत्र खेळून काढले असते आणि 250 पर्यंतची धावसंख्या नोंदविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले असते,’ असे ते म्हणाले.
Previous Articleस्मिथचे शतक, सिराजचे 4 बळी
Next Article माझ्याशिवाय येथे कोणत्याही गोष्टीला थारा नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.