ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
भारताने चिनी नागरिकांसाठीचा पर्यटक व्हिसा निलंबित केला आहे, असे जागतिक एअरलाइन्स संस्था IATA ने 20 एप्रिल रोजी आपल्या सदस्य वाहक कंपन्यांना सांगितले.
चीनच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या सुमारे 22,000 भारतीय विद्यार्थ्यांच्या दुरवस्थेबाबत भारत सरकार चीनकडे पाठपुरावा करत आहे. या विद्यार्थ्यांवर बंदी घातल्याने प्रत्यक्ष वर्गातील सत्रासाठी ते परत जाऊ शकत नाहीत. 2020 च्या सुरुवातीला कोविड-19 महामारी सुरू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना चीनमधील शिक्षण सोडून भारतात यावे लागले.
चीनच्या या वर्तणुकीवर भारताने आक्षेप घेतला असून चीनच्या पर्यटकांचा व्हिसा निलंबित करून सडेतोड उत्तर दिले आहे.
भारताबाबत जारी केलेल्या परिपत्रकात, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (IATA) म्हटले आहे की, चीनच्या नागरिकांना दिलेले पर्यटक व्हिसा अवैध आहेत.” भारतात प्रवेश करण्याची भूतान, भारत, मालदीव आणि नेपाळचे नागरिक; भारताने जारी केलेला निवास परवाना असलेले प्रवासी; भारताने जारी केलेला व्हिसा किंवा ई-व्हिसा असलेले प्रवासी; भारताचे परदेशी नागरिक (OCI) कार्ड किंवा पुस्तिका असलेले प्रवासी; भारतीय वंशाचे (PIO) कार्ड असलेले प्रवासी; आणि डिप्लोमॅटिक पासपोर्ट असलेले प्रवासी यांना परवानगी असेल.