वृत्तसंस्था /बेलग्रेड
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वत:च्या दोन देशांच्या अंतिम टप्प्प्यांतर्गत सर्बिया येथे पोहोचल्या आहेत. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये त्यांनी अनिवासी भारतीयांना संबोधित पेले आहे. सर्बिया हे भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक नवे फिल्म डेस्टिनेशन म्हणून उदयास आले आहे. सर्बियामध्ये भारतीय चित्रपट लोकप्रिय ठरत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. अनेक सर्बियन नागरिक योगसमवेत भारताच्या अध्यात्मिक वारशाबद्दल उत्सुक असतात. सर्बियात आयुर्वेदाला उपचार प्रणाली म्हणून मान्यता प्राप्त आहे. भारत आणि सर्बियाने नेहमीच परस्परांच्या हितांची जपणूक केली असल्याचे वक्तव्य राष्ट्रपतींनी केले.सर्बियातील भारताचे राजदूत संजीव कोहली यांच्याकडून आयोजित एका सामुदायिक स्वागत सोहळ्यात राष्ट्रपतींनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला आहे. आधुनिक युगात सर्बियासोबत भारताचे संबंध हे प्रामुख्याने गटनिरपेक्ष चळवळीच्या दृष्टीकोनातून निर्माण झाले होते. सर्बिया आणि भारत यांच्यातील मैत्री निर्माण करण्यात दोन्ही देशांच्या नागरिकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्बिया भारताच्या निरंतर विकास सहकार्य कार्यक्रमांमध्ये एक मूल्यवान भागीदार राहिला असल्याचे मुर्मू यांनी म्हटले आहे.