हार्दिक सिंगची अनुपस्थिती जाणवणार, उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी विजय गरजेचा
प्रतिनिधी/ भुवनेश्वर
पदार्पण करणाऱ्या वेल्सविऊद्धच्या सामन्यात अपेक्षेइतकी समाधानकारक कामगिरी करता न आल्याने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशाची संधी गमवावी लागलेल्या यजमान भारताचा सामना आज रविवारी न्यूझीलंडशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी आपल्या आक्रमणातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न भारताला करावा लागणार असून हार्दिक सिंगची उणीवही जाणवणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
‘ड’ गटामध्ये अव्वल स्थानावर जाण्यासाठी आणि थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी आठ गोलांच्या फरकाने भारताला जागतिक क्रमवारीत आठ स्थानांनी खाली असलेल्या वेल्सचा पराभव करायचा होता. परंतु आघाडीपटूंकडून हवी तितकी प्रभावी कामगिरी न झाल्याने फिनिशिंगमध्ये कमी पडून त्यांना गुऊवारी केवळ 4-2 असा विजय मिळवता आला. शिवाय भारतीय बचावफळीला जागतिक क्रमवारीत 14 व्या क्रमांकावर असलेल्या वेल्सकडून झालेले दोन गोल रोखण्यात अपयश आले.
भारताने आता न्यूझीलंडविऊद्ध सामना जिंकणे आवश्यक आहे. न्यूझीलंडने ‘क’ गटामध्ये एक विजय आणि दोन पराभवांसह तिसरे स्थान पटकावलेले आहे. भारताच्या सहाव्या स्थानाच्या तुलनेत सध्या जगात 12 व्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला कधीही उपांत्य फेरीत पोहोचता आलेले नाही. त्यांनीही स्पर्धेत काही विलक्षण कामगिरी केलेली नाही. त्यामुळे कलिंगा स्टेडियमवर भारताचे पारडे निश्चित जड असेल. गेल्या वर्षी ‘एफआयएच प्रो लीग’मध्ये भारताने न्यूझीलंडला 4-3 आणि 7-4 अशा फरकाने नमविले होते.
भारताचा प्रमुख मिडफिल्डर हार्दिक सिंग 15 रोजी इंग्लंडविऊद्धच्या सामन्यात झालेल्या त्याच्या धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरल्याने त्याला स्पर्धेतील उर्वरित टप्प्यात खेळता येणार नाही. हार्दिकची अनुपस्थिती ही भारतासाठी एक मोठा धक्का आहे. कारण ते आक्रमणाच्या विभागात सध्या धडपडत असून न्यूझीलंडला हरवल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा गतविजेत्या बेल्जियमशी सामना होण्याची शक्यता आहे.
सलामीच्या सामन्यात भारताने स्पेनविऊद्ध मिळविलेल्या 2-0 विजयात शानदार एक गोल करणाऱ्या हार्दिकच्या जागी राजकुमार पाल खेळणार आहे. मात्र तो वेल्सविऊद्ध खेळला नव्हता. कर्णधार हरमनप्रीत सिंगकडून प्रभावी कामगिरीची आज यजमांना अपेक्षा राहणार असून हार्दिकच्या अनुपस्थितीत मनदीप सिंग आणि आकाशदीपसारख्या वरिष्ठ खेळाडूंची कामगिरीही खूप महत्त्वाची ठरणार आहे.