India- China Border Dispute : अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्याने काही काळ चकमक उडाली. आज 9 डिसेंबर रोजी झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान आमने-सामने आले. एकंमेकाला भिडलेल्या या जवानांमध्ये धक्काबुक्की आणि मारहणीचा प्रकार घडला असून काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये हा प्रकार घडला आहे. चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली त्यामुळे भारतीय सैनिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे धक्काबुक्की होउन प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. यापुर्वी पूर्व लडाखमध्ये झालेल्या घटनेनंतर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेली ही पहिलीच चकमक असल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेनंतर भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी शांतता पुन्र्थापित करण्यासाठी चर्चा करण्यासाठी चीनच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी ध्वज बैठक बोलावली.
यापुर्वी जून 2020 मध्ये गलवान व्हॅली येथे अशी चकमक झाली होती त्यामध्ये 20 भारतीय शहिद झाले होते तर 40 हून अधिक चिनी सैनिक ठार आणि जखमी झाले होते. गलवान घटनेमुळे दोन्ही राष्ट्रांमधील वातावरण अत्यंत तणावपुर्ण बनले होते.
Previous Articleवादग्रस्त वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची जाहीर माफी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment