नवी दिल्ली
भारताचे ट्रक मार्केट आगामी म्हणजे 2050 पर्यंत जवळपास चारपटीपेक्षा अधिकची वाढ होणार असल्याचे निती अयोगाने आपल्या अहवालामध्ये सांगितले आहे. सदरच्या अहवालानुसार आर्थिक संस्था शून्य उत्सर्जन असणाऱया ट्रकसाठी अधिक अनूकूल असून यातून आर्थिक सुलभता प्राप्त करणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. रस्ते मालांची उलाढाल वाढण्यासोबतच वर्ष 2050 पर्यंत ट्रकांची संख्या ही चारपटीपेक्षा अधिक वाढत जात हा आकडा 1.7 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता असून हा आकडा 2022 मध्ये जवळपास 40 लाख इतका असल्याची नोंद आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासह सोबत परिवहन उत्सर्जनही वाढत जाणार असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.