बेळगाव : सांबरा येथील विमानतळ परिसरात कोल्हा व इतर प्राण्यांचा वावर वाढला आहे. मुख्य धावपट्टीवर प्राणी आल्यास त्याचा धोका निर्माण होवू शकतो. प्राणी विमानतळ परिसरात येणार नाहीत, यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक शिवरुद्रप्पा कबडगी यांनी विमानतळ परिसराला भेट देऊन आढावा घेतला. बेळगाव विमानतळाचा परिसर मानवी वस्तीला लागून आहे. आसपासच्या गावातील कचरा विमानतळाच्या शेजारी असणाऱ्या परिसरात फेकला जात असल्याने पक्ष्यांचे प्रमाण वाढले होते. तसेच भटकी जनावरेदेखील भरकटत होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सांबरा तसेच आसपासच्या गावांमधील पीडीओ तर ग्रा. पं. अध्यक्षांना बोलावून कचरा टाकण्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना केल्या होत्या. आता विमानतळ परिसरात कोल्ह्यांचाही वावर वाढल्याचे लक्षात येत आहे. संरक्षक भिंत असली तरी एखादा कोल्हा धावपट्टीवर आल्यास विमानाच्या उ•ान तसेच लँडिंगला धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे विमानतळ संचालक त्यागराजन तसेच मुख्य वनसंरक्षणाधिकारी शिवरुद्रप्पा कबडगी यांनी परिसराची पाहणी करत तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. यावेळी विमानतळ तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleबेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेसचा शुभारंभ
Next Article एसपीएम रोडवरील खोकी हटविली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment