स्वकियांच्या मृत्यूनंतर आठवण जपण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा कांबळे कुटुंबियांचा प्रयत्न
कोल्हापूर : प्रतिनिधी
अंबप, ता. हातकणंगले येथील अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले सुरेश सहदेव कांबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कांबळे यांच्या कुटूंबियांनी पुरोगामी निर्णय घेऊन रक्षाविसर्जनावेळी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी त्यांच्या रक्षा अथवा अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत अथवा इतर कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी विसर्जन न करता, त्यांच्या अस्थींचे पूजन करून शेतात पुरून त्यावर वृक्षारोपण करून त्यांची आठवण जपण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केला आहे.
रक्षाविसर्जनावेळी सुरवातीस तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरेश कांबळे यांना अभिवादन करण्यात आली. तसेच मृत्यूनंतर पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन सुतक न पाळता सातव्या दिवशी सर्व कार्यक्रम उरकण्यात आले. विविध कर्मकांड नाकारून प्रर्यावरणपूरक विधी संपन्न करण्यात आला.
यावेळी त्यांची मुले पत्रकार कुणाल कांबळे, अक्षय कांबळे, सनी कांबळे, विवेक बनसोडे, ओंकार बनसोडे, जितेंद्र कांबळे, स्वप्नील कांबळे, यासह नातेवाईक, मित्रमंडळी व समाजबांधव उपस्थित होते.