ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक देखील बंद आहे. त्यातच आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन (IRCTC) ने आपल्या खाजगी ट्रेनच्या बुकिंग 30 एप्रिल पर्यंत रद्द केले आहेत.
IRCTC कडून तीन खाजगी रेल्वे चालवल्या जातात. यामध्ये दोन तेजस ट्रेन आणि एक काशी महाकाल एक्सप्रेस चा समावेश आहे.
अधिक माहितीनुसार, लॉक डाऊन मुळे या तिन्ही ट्रेनमध्ये 25 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान करण्यात आलेली सर्व बुकिंग रद्द करण्यात आली होती.
पण आता IRCTC ने 30 एप्रिल पर्यंतची सर्व बुकिंग रद्द केली आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच 30 एप्रिल पर्यंत ज्यांनी ज्यांनी या तिन्ही ट्रेनमध्ये बुकिंग केले आहे. त्या सर्व प्रवाशांना त्यांचे पूर्ण पैसे रिफंड द्वारे देण्यात येणार आहेत, असे ही IRCTC कडून स्पष्ट करण्यात आले आहे.