नवी दिल्ली : शक्तीभोग फूडस कंपनी दिवाळखोरीत असून तिच्या खरेदीसाठी अनेकांचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. यामध्ये आघाडीवरची एफएमसीजी कंपनी आयटीसीचा स्पर्धेत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. शक्तीभोग फूडस् अंतर्गत शक्तीभोग आटा हे पिठाचे उत्पादन बाजारात उपलब्ध होत असायचे. दिवाळे निघाल्यानंतर सदरचे पीठ बाजारात मिळणे बंद झाले होते. पॅकेजड स्वरुपात पीठ विक्री करणारी ही जुनी कंपनी आहे. 2000 साली दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतात शक्तीभोग आटा (पीठ) खूप लोकdिरप्रय झाले होते. पण त्यानंतर ते बाजारातून गायब झाले. आता आशीर्वाद ब्रँड नावाने पीठ विक्री करणाऱ्या आयटीसीने सदरची कंपनी खरेदी करण्याचे मनसुबे रचले असल्याचे समजते. यासोबत अन्य 2 कंपन्यांचेही यासाठी प्रयत्न सुरु आहेत अशीही माहिती मिळते आहे. बघुया, यात यश कोणाच्या पदरी पडते ते.
Previous Articleभारत-बांगलादेश दरम्यान लवकरच सीमा विषयक चर्चा
Next Article भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment