व्होडाफोन-आयडिया यांच्या ग्राहकांची संख्या 15.4 लाखांनी घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओचा दबदबा सध्याला वाढतच चालला असून जास्तीत जास्त ग्राहक मिळवले जात आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या मते, जिओने जुलैमध्ये 29.4 लाख नवीन ग्राहकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहे. यासह, जिओ नेटवर्क ग्राहकांची संख्या 41.59 कोटीच्या घरात पोहोचली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
5.1 लाख नवीन वापरकर्ते भारती एअरटेलशी जोडले गेले
दुसरीकडे ग्राहक जोडणीत भारती एअरटेलनेही चांगली कामगिरी नोंदवलीय. जुलैमध्ये 5.1 लाख नवीन ग्राहक भारती एअरटेलसोबत जोडले गेले आहेत. यासोबतच एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 36.34 कोटीच्या घरात पोहोचली आहे. याच दरम्यान मात्र, व्होडाफोन आयडियाचे ग्राहक दिवसागणिक कमी होत आहेत. व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या 15.4 लाख इतक्या ग्राहकांनी जुलैमध्ये नेटवर्क सोडले आहे. यासह, एकूण ग्राहकांची संख्या 25.51 कोटी आहे.
ग्रामीण भागात मोबाईल ग्राहकांची संख्या कमीच
शहरी भागात मोबाईल फोन वापरणाऱयांची संख्या वाढत असली तरी ग्रामीण भागात मोबाईल फोन वापरणाऱयांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. जूनच्या तुलनेत संख्या 65.04 कोटी झाली आहे.
देशात 114.8 कोटी मोबाईल फोन ग्राहक
ट्रायच्या अहवालानुसार, जुलै महिन्यात देशातील मोबाईल फोन ग्राहकांच्या संख्येत 0.06 टक्के वाढ झाली आहे. सध्या देशात अंदाजे 114.8 कोटी मोबाईल फोनचे ग्राहक असल्याची माहिती आहे.