ऑनलाईन टीम/तरुण भारत
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Bollywood Actress Juhi Chawla) तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या विषयावर तिने ट्वीट केलं असून आता दक्षिण मुंबईत फिरताना प्रदूषित हवा आणि दुर्गंधी पसरली असून तिचा त्रास होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या ट्वीटनंतर त्यावर अनेकांनी चांगल्या आणि वाईट कमेंट्स केल्या आहेत. तर उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जुही मुंबईतील प्रदूषित हवा आणि दुर्गंधीवर ट्वीट करत म्हणते की, कुणाला हवेतील दुर्गंधीची जाणीव होते का? या आधी वांद्रे, वरळी, मिठी नदीच्या, नाल्याच्या बाजूने जाताना ही दुर्गंधी यायची. आता याची व्याप्ती वाढली असून संपूर्ण दक्षिण मुंबईतच ड्रायव्हिंग करताना त्याची जाणीव होते. मुंबईतील हवेमध्ये दिवसेंदिवस दुर्गंधी वाढतच चालली आहे, प्रदूषणामध्ये वाढ होतच आहे. दिवसेंदिवस आपल्याला असं वाटतंय की आपण दुर्गंधी आणि हवेच्या प्रदूषणातच जगतोय.
हे ही वाचा : झुलता पूल कोसळून १४० ठार
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने काही दिवसांपूर्वी मुंबईतील पर्यावरणाबाबत भाष्य केले होते. हवेत पसरलेली दुर्गंधी कुणाच्या लक्षात आली आहे का, अशा सवाल उपस्थित करत जुही चावलाने आपले मत सोशल मीडियावर मांडले होते. मात्र, जुही चावलाने मुंबईबद्दल केलेल्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला वाटतं कोणत्याही सेलिब्रिटींनी अशाप्रकारची वक्तव्य करू नयेत”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काय म्हणाले फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीसांच्या जुही चावलाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबईमध्ये आपण इतके प्रोजेक्ट करत आहोत. मुंबईत मुलभूत सुविधा करत आहोत. मला वाटतं कोणत्याही सेलिब्रिटींनी अशाप्रकारची वक्तव्य करू नयेत”, असे म्हटले.