मागील श्लोकात यक्षाने मेघाचे स्वागत केले आणि त्याला अर्घ्य देऊन त्याचा सत्कार केला. आता आपण त्याला काम सांगितले तर त्याने ते ऐकावे, म्हणून तो त्याची स्तुती करू लागला.
जातं वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानां
जानामि त्वां प्रकृतिपुरुषं कामरूपं मघोनः।
तेनार्थित्वं त्वयि विधिवशाद् दूरबन्धुर्गतोएहं
याचा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा।।6।।
अर्थः- पुष्करावर्तक नावाच्या मेघांच्या जगद्विख्यात कुळात तू जन्मलेला आहेस. तू इच्छित रूप धारण करतोस. इंद्राच्या सेवकांत तू श्रे÷ आहेस. या कारणांमुळे मी तुला याचना करीत आहे. कारण दुर्दैवाने मी प्रियजनांपासून दूर येऊन पडलो आहे. थोर माणसाला केलेली याचना विफल झाली तरी परवडते. पण क्षुद्र माणसाला केलेली याचना सफल झाली तरी नको. वरील श्लोकात मल्लिनाथाने पुष्कर आणि आवर्तक ही मेघांची दोन निराळी कुळे मानली आहेत. पण ‘पुष्करं जलं आवर्तयन्ती भ्रामयन्ती इति पुष्करावर्तकः’ अशी उपपत्ती काही पंडितांनी दिली आहे. त्यानुसार पुष्करावर्तक हे एकच कुळ ठरते. ब्रम्हांडपुराणात मेघांच्या उत्पत्तीचे तीन प्रकार सांगितले आहेत. 1.अग्नीपासून 2.ब्रम्ह्चा्या श्वासोच्छ्वासापासून 3.इंद्राने पर्वतांचे जे पंख तोडले त्यापासून. ह्यातील तिसऱया प्रकाराला पुष्करावर्तक मेघ म्हणतात. ह्यातही आणखी अनेक पंडितांनी वरील प्रकार एकमेकांत मिसळून अन्य प्रकार तयार होतात असे सांगितले आहे.
यक्षाने मेघाला आणखी खुश करण्यासाठी त्याला खुलवून मोठय़ा खुबीने आपली कामगिरी त्याच्यावर लादली. तो म्हणतो,
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियायाः
संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेषितस्य।
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां
बाह्योद्यानस्थितहरशिरश्चन्दकाधौतहर्म्या।।7।।
अर्थः- हे पयोदा, तू उन्हाने संतप्त झालेल्यांचा ताप शमवतोस, अशी तुझी कीर्ती आहे. मीही विरहाग्नीने तप्त झालो आहे. म्हणून यक्षाच्या क्रोधामुळे विरह पावलेल्या माझा निरोप घेऊन जा. बाह्योद्यानात रहात असलेल्या शंकराच्या डोक्मयावरील चंद्रप्रकाशाने अलका नगरीतील वाडे सदैव चमकताना दिसतील. यातील यक्षेश्वर म्हणजे कुबेर. पण यक्ष कुबेराचा सेवक असल्याने त्याने आदरार्थी बहुवचन ‘यक्षेश्वराणाम्’ असा त्यांचा उल्लेख केला आहे. तसेच अलका नगरीचाही उल्लेख आला आहे. ती बघण्यासारखी आहे. पण रामगिरी (नागपूर मधील रामटेक) पासून ती कितीतरी लांब आहे. तिचे वर्णन पुढील श्लोकापासून आपण पाहू.