प्रतिनिधी/खानापूर : रोजगार हमी अंतर्गत खानापूर शहरातिल बेरोजगार स्त्रियांना रोजगार मिळावा, यासाठी बुधवार सकाळी अकरा वाजता शहरात महिलांनी फावडे बुट्ट्यासह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर दिवस काम दिले जाते. त्याच धर्तीवर शहरात ही दारिद्र्यरेषेखाली कुटुंबे आहेत. त्यांना या योजनेतून शंभर दिवस काम देण्यात यावे. या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.