चुये / प्रतिनिधी
या युवकाने नोकरी मिळत नसल्यामुळे त्या नैरशातून शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी ही घटना घडली. याची नोद इस्पूर्ली पोलिसात झालीआहे .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की प्रसाद मगदूम याने भारतीय सैन्य दलामध्ये नोकरी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते त्याचा चुलत भाऊ सैन्य दलामध्ये आहे त्यामुळे त्यालाही सैन्य दलामध्ये नोकरी हवी होती त्यासाठी त्याने वारंवार भरतीमध्ये प्रयत्न केला होता मात्र त्याला त्यामध्ये यश आले नाही तो पदवीधर असल्यामुळे त्याने रोपवाटिका प्रशिक्षण घेऊन काही महिन्यापासून रोपवाटिका सुरू केली होती . रोपवाटीका उभारणीसाठी त्याने पाचलाखाचे कर्ज घेतले होते . रोपवाटीका व्यवसाया मधून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही त्यामुळे कर्ज परतफेड कशी करायची हा प्रश्न त्याला स्वस्थ बसू देतनव्हता त्यामुळे त्याचे रोपवाटीका व्यवसायात मन रमत नव्हते . त्यातून तो नैराश्य अवस्थेत गेला होता . नोकरी नाही व्यवसायातून यश मिळवू . अशी धारणा झालेल्या प्रसाद ला रोपवाटीकेत अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे या नैराश्य अवस्थेतून तो बाहेर आला नाही त्यामुळे त्याने गुरुवारी आपल्या शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन यात्रा संपवली.
प्रसाद हा एकुलता एक मुलगा होता . त्यामुळे त्याची घळफास अवस्था बघून वडील व आईने फोडलेला हंबरडा हदय पिळवटून टाकणारा होता . त्याच्या पश्चात एक लहान बहीन आहे त्याच्या अचानक जान्याने एक मनमिळावू मितभाषी व प्रेमळ मनाचा कष्टाळू वृत्तीचा प्रसाद गेल्याने गावात त्याच्या मित्र परिवारात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती . वडील पांडूरंग मगदूम यांनी याबाबतची फिर्याद इस्पुर्ली पोलीसात दिली .