अध्याय बाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा! शीत-उष्ण, सुख-दुख इत्यादि गोष्टी सहन करून परिपूर्ण शांती साधावी आणि पूर्णब्रह्मस्वरूपाला पोहचावे. पूर्णब्रह्माला पोचल्यानंतर जन्ममरणाची गोष्टच खुंटते आणि परमानंदाची मिठी पडली की, संसारभय नष्ट होते. हे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून उद्धव अतिशय चकित झाला. तो मनात म्हणाला, कुणीही कितीही उपद्रव दिला, छळ केला तरी तो शांत राहून सहन करणे इतकी पराकोटीची शांती बाळगणे कुणाला तरी शक्मय आहे का? असल्या ह्या शांतीच्या गोष्टी कधी ऐकलेल्यासुद्धा नाहीत, मग डोळय़ांनी कशा पाहणार? असा शांत पुरुष या साऱया पृथ्वीतलावरसुद्धा नसेल. असा विचार करून तो भगवंतांना म्हणाला, हे कृष्णा! पूर्वी कधी ऐकली नाही की पाहिली नाही अशी ही शांती तू काढलीस तरी कोठून? मोक्ष मिळवण्यासाठी इतकी शांती धारण करण्याची आवश्यकता आहे ही कल्पना ऐकूनच माझी बुद्धी भयाने अगदी गांगरून गेली आहे. अशी शांती ज्याला लाभली आहे, असा मागे कोणी झालेला मी ऐकला नाही व पुढे कोणी होईल असेही वाटत नाही. म्हणून तू जो निग्रह सांगितलास तो आम्हाला साधणे परम दुर्घट आहे. साधुवर ओढवणाऱया परिस्थितीचे जे वर्णन तू केलेस, ते द्वंद्व योग्यालासुद्धा सहन होणे कठीण, मग आम्हा सामान्य जनांना कसे सहन होईल? या माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगण्यास तूच कुशल आहेस. हे विश्वात्मन! जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांनासुद्धा स्वभाव बदलता येणे शक्मय नाही. दुर्जनांची कृत्ये मला तर मुळीच सहन होण्यासारखी नाहीत. म्हणून मी आपले सांगणे आचरणात कसे आणू शकेन हे मला समजाऊन सांगा. तुम्ही सांगितलेत ते अत्यंत पवित्र आहे. पण माझ्या अंतःकरणात त्याचा बोध होत नाही कारण, दुसऱयाचे अपराध सहन करणार कोण? दुसऱयाचे अपराध सहन करायचे महाकठीण असून मानवी स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. तेव्हा हा महान उपदेश आचरणात आणणे अत्यंत कठीण आहे. एकवेळ कुणी कुणाचा अपराध केला तर कोटय़वधि मनुष्यातून एखादा कोणीतरी तो सहन करेल परंतु हलकट मनुष्याने केलेला छळ कोणीही सहन करणार नाही. ज्याचे तोंडसुद्धा पाहू नये, ज्याला कधी नमस्कार करणेही उचित नव्हे, त्याने जर डोक्मयावर लाथा मारल्या, तर श्रीकृष्णा! त्या कोण बरे सहन करेल? ज्याच्या शरीरातून प्राण पूर्णपणे निघून गेलेला असेल तोच हा असा अपमान सहन करील. परंतु जो जिवंत आहे त्याला हे कधीच सहन व्हायचे नाही. इतरांची गोष्ट कशाला? परंतु खरोखर जे ज्ञानी असतात ते देखील स्वतःची आज्ञा कोणी थोडीशी मोडली तर तेही सहन करीत नाहीत, मग अपमान सहन करणार कोण? कपिल महामुनीलाही क्रोध आला होता, म्हणून त्याने सगरांना शाप देऊन त्यांचे भस्म करून सोडले. नारदांनी कुबेराच्या मुलाला शापून वृक्ष करून सोडले. दुर्वासाची गोष्ट सांगावयाला गेले तर त्यांची ती हकीकत कितीतरी मोठी आहे. शृंगी ऋषीच्या अंतःकरणांत कोप आला आणि पित्याच्या गळय़ात मृतसर्प घालणाऱया परीक्षितीला त्याने शाप दिला. सनकादिकांच्या ठिकाणी मुख्यतः शांती असावयाची. पण तेही वैकुंठास गेले असता त्यास आत जाण्यास जयविजयांनी आडकाठी केली, म्हणून रागाच्या भरात त्यांनी जयविजयाना शाप दिला. ज्ञानसंपन्न लोकांची ही स्थिती, मग त्यांच्यापुढे इतरांचा पाड काय? गोविंदा! दुसऱयाचे अपराध सहन करण्याइतकी शांती त्रिभुवनांतही दुर्लभ आहे हेच यावरून सिद्ध होते. प्रकृती ही आपल्या गुणांनी प्रबळ झालेली आहे. ती थोडय़ाशा कारणाने देखील गुणांना तत्काळ धुन्ध करिते. निखालस साधू व सज्जनांना हा क्रोध विकल करून सोडतो. ज्याला तुझीच परिपूर्ण भक्ति घडते, ज्याला तुझ्याच पूर्ण कृपेचा लाभ होतो, तुझ्या चरणाच्या ठिकाणी जो अखंड लीन होतो, त्यालाच असली शांती प्राप्त होऊ शकेल.
क्रमशः