राधानगरी पोलीसांची तातडीने कारवाई
भोगावती/प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील प्रेमी व राधानगरी तालुक्यातील प्रियेसी आपापल्या घरातून पळाले.मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने व दोघांच्याही नातेवाईकांनी त्वरित तक्रारी दिल्याने पोलिसांना चक्क नागपुरात सापडले.राधानगरीच्या उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी वाटोडा (नागपूर) येथून त्यांना ताब्यात घेतले.आता दोघांनाही पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले आहे.
याबाबतची पोलिसातून मिळालेली माहिती अशी की,या आश्चर्यकारक प्रकरणातील युवती ही राधानगरी तालुक्यातील व युवक हा करवीर तालुक्यातील आहे.दोघांचेही एका महाविद्यालयात प्रेमाचे सुत जुळले.दोघेही अल्पवयीन असल्याने घरातून पळून जाऊन आपला उद्देश साध्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.लग्न करण्यासाठी आवश्यक वय पुर्ण झाल्यानंतर लग्न करुन संसार थाटण्याचा निश्चय करुन हे दोघे नागपूर येथे एकत्र रहात होते.
याबाबतची खबर नागपूर येथील वाटोडा पोलिसांना लागली की करवीर व राधानगरी तालुक्यातील हे अल्पवयीन प्रेमीयुग येथे एकत्र राहत आहेत.त्यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधुन याबाबतची माहीती दिली.त्यानंतर राधानगरीच्या पो.उपनिरीक्षक अनुराधा पाटील व करवीर पोलीसांनी नागपूरला तातडीने जाऊन दोघांनाही पकडले.मुलीच्या जबाबावरून आय.पी.सी.कलम ४६६ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या अल्पवयीन दोघाही प्रेमीयुगलांना बालसुधारगृहात दाखल केले आहे.