आजपर्यंत १७ जनावरांचा मृत्यू, पशुपालकांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे
प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव वरचेवर वाढत असून शुक्रवारी एकाच दिवशी चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने आजपर्यंत 17 जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी पशुसंवर्धन विभाग अहोरात्र परिश्रम घेत असून या आजारामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
या आजाराने चार गायींचा मृत्यू झाला. यामध्ये सांगोला तालुक्मयातील वाढेगाव, मिसाळवाडी आणि धायटी येथील प्रत्येकी एक तर मंगळवेढा तालुक्मयातील कचरेवाडी येथील एका गायीचा समावेश आहे. जिल्ह्यात लम्पी आजाराने आतापर्यंत 17 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 गायी आणि सात बैलांचा समावेश आहे.
मृत झालेले जनावरे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे, माळशिरस तीन बैल व एक गाय असे एकूण चार जनावरांचा समावेश आहे. तर तिरवंडी एक बैल, शिंदेवाडी एक बैल, कचरेवाडी एक गाय, सांगोला पाच गायी यामध्ये शिवणे, महूद, धायटी, मिसाळवाडी व वाढेगाव या पाच गावांतील प्रत्येकी एका गायीचा समावेश आहे. तर पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील एका गायीचा समावेश आहे. माढा तालुक्यातील चौभेपिंपरी येथील एका बैलाचा समावेश आहे. तर करमाळा तालुक्यातील सावडी व राजुरी या गावातील दोन गायींचाही सनावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे एक गाय, बेलाटी एक बैल, देगाव एक गाय, (बसवेश्वरनगर) समावेश आहे. सध्या जिल्हाभरात 172 जणांची लसीकरण टीम तसेच महाविद्यालयातील 10 विद्यार्थ्यांची टीम लसीकरण करत आहे.
तेव्हा पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यास पशु वैद्यकीय दवाखान्यात त्वरित दाखवून घ्यावे. तसेच जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.