संतप्त विद्यार्थ्यांची निदर्शने : लोकप्रतिनिधी, वरि÷ अधिकाऱयांच्या भेटीनंतरही परिस्थितीत सुधारणा नाही
प्रतिनिधी /बेळगाव
समाजकल्याण खात्याच्यावतीने चालविण्यात येणाऱया विद्यार्थी वसतीगृहात सणासुदीतही विद्यार्थ्यांना अळय़ा व लूस असलेले अन्न पुरविण्यात आले आहे. त्यामुळे भांडी वाजवत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. लोकप्रतिनिधी व वरि÷ अधिकाऱयांच्या भेटीनंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
आझमनगर येथील बाबु जगजीवनराम उद्यानाजवळ असलेल्या विद्यार्थी वसतीगृहात ही घटना घडली आहे. भातामध्ये अळय़ा, झुरळ आढळून आले. त्यामुळे वसतीगृहाच्या अधिकाऱयांना भेटून विद्यार्थ्यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला. याची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके व जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील हे वसतीगृहात दाखल झाले. विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली.
प्रत्यक्ष पाहणीनंतर भातामध्ये अळय़ा व लूस दिसून आली. त्यावेळी तातडीने उत्तम प्रतीचे तांदूळ आणण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. दुपारी जिल्हाधिकाऱयांनी कानउघाडणी केल्यानंतरही परिस्थितीत बदल दिसून आला नाही. रात्रीच्या जेवणासाठी बनवलेल्या भातातही अळय़ा आढळून आल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱयांशी पुन्हा संपर्क साधला. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधताच रात्री उत्तम दर्जाचे तांदूळ आणण्यासाठी अधिकाऱयांची धावपळ उडाली होती. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.