ज्याची कुवत आहे, त्यालाच कळेल आमच्या झोळीत काय आहे. निवडणूक म्हणजे कालचक्र आहे. सगळ्यांना त्याच मार्गातून जावं लागणार आहे. महाडिक कुटुंबाला नागरिक कंटाळले असे म्हणतात त्यांना समोर आणा, असे थेट आव्हान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना दिले आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या दरम्यान महाडिक-पाटील गट पुन्हा आमने सामने आला आहे.
पत्रकार परिषदेत महाडिक बोलत होते. महाडिक कुटुंबाला नागरिक कंटाळे असं म्हणतात, त्यांना समोर आणा. जर असे झाले तर राजकारणातून संन्यास घेईल. अशा शब्दात माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना महादेवराव महाडिक यांनी टोला लगावला.
कारखान्याचा निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांना समजून येईल. साक्षात शंकराच्या मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितलं.