ऑनलाईन टीम/तरुण भारत
चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यांनतर पक्षाच्यावतीने त्यांच्या सत्काराचा कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकार पाडण्याबाबत मोठा गैप्यस्फोट केला. दोन अडीच वर्ष मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार, मी वेडा नव्हतो, मला माहिती होतं की आपलं सरकार येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. अडीच वर्ष खरंच आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
पाटील पुढे म्हणाले, अशा सत्कार करण्यात आपण वेळ व पैसा घालवतो म्हणुन मी तो टाळत होतो. मात्र, तुमचं मन जपण्यासाठी मी आलो. पुणे महापालिका व इतर निवडणुकांसाठी हा कार्यक्रम उपयोगी पडेल म्हणून मी आलो आहे. देवाला देखील स्तुती आवडते, मी तर माणूस आहे, असेही पाटील म्हणाले.
हे ही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये मतभेद? शिवसेनेला पाठिंबा दिल्याने काँग्रेस नेते नाराज
आपण मागील अडीच वर्ष खुप भोगले, विरोधी पक्षाने आपल्याला खुप त्रास दिला, असा आरोप पाटील यांनी केला. २०२४ ते २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रकल्प आणले ते रद्द करण्याच काम मागील सरकारने केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेट्रो प्रकल्प, असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला सरकार आण्यासाठी ४० जणांची गरज होती. ४० जणांना बाहेर काढण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे सरकार आण्यासाठी वेळ लागला असेही ते यावेळी म्हणाले.