ऑनलाईन टीम/तरुण भारत :
सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली असून 2024 च्या निवडणुकीत पूर्ण ताकद लावणार असून भाजपला रोखणार असल्याचे म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात सरकारी एजन्सीना वापरत आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर बॅनर्जी यांनी केंद्रावर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
त्या असे ही म्हणाल्या की भाजपला केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना शांत करायचे आहे. या तपास यंत्रणा फक्त जैन, नवाब मलिक यांच्याविरुद्धच काम करतात का? भाजप नेत्यांच्या विरोधात का नाही? केंद्रातील भाजप सरकार भेसळखोर बनले आहे. या लोकांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. नोटाबंदीसारखी निर्णय फक्त निष्फळ ठरले नाहीत तर हा मोठा घोटाळा होता.