किणये
अष्टे गावात सामूहिक ममदय़ाचा (पुंडलिक पूजन) कार्यक्रम बुधवारी सायंकाळी विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे मोठय़ा भक्तिमय वातावरणात झाला.
अष्टे गावातून पंढरपूरला पायी दिंडी गेली होती. पायी दिंडीचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. दिंडीचे प्रमुख हभप नागेंद्र सुभानजी, आप्पय्या धामणेकर, गजानन चौगुले, भीमा झाजरी, नागाप्पा शिंदे आदींचा ग्रामस्थ व वारकरी सांप्रदायवतीने शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. विठ्ठल-रखुमाई मूर्ती पूजन, पुंडलिक पूजन करण्यात आले. हरिपाठ कार्यक्रमही झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पायी दिंडीतील पंधरा दिवसांच्या प्रवासाबद्दल अनेक वारकऱयांनी आपल्या भाषणांतून समाधान व्यक्त केले. पायी दिंडीतून पंढरपूरला जाणे भाग्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला लक्ष्मण काकती, गणपत बाबूगावडा, मुपुंद धामणेकर, श्रीकांत सुभानजी, बसवराज सुभानजी, शिवराज काजगार आदींसह वारकरी उपस्थित होते.