वार्ताहर /किणये
एकता एक संघटना बेळगाव यांच्यावतीने बेळगाव तालुक्यातील दहावीच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शानभाग चेंबर्स बेळगाव येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन रविवारी दुपारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता एक संघटनेचे अध्यक्ष नारायण झंगरूचे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील, शाहीर व्यंकटेश देवगेकर, उद्योजक संदीप ओऊळकर, उद्योजक सारंग देसाई, गजानन मिसाळे, विठ्ठल वाघमोडे, सागर झंगरुचे, विजय तिप्पानाचे, गोपाळ पाटील, नारायण सांगावकर, अनिल पाटील आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक शिवाजी कंग्राळकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत संघटनेचे सचिव अमोल जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राजकिरण नाईक, कल्लाप्पा पाटील यांनी करून दिला. मराठा समाजाच्या नागरिकांसाठी आपण विशेष प्रयत्न करू, असे उपमहापौर रेश्मा पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. त्यानंतर व्यंकटेश देवगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. रणजीत चौगुले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण झाले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून नारायण झंगरुचे यांनी मराठा समाजाची सामाजिक एकता आणि संघटनेचे कार्य आणि संघटनेचे पुढील उद्देश याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी जे. बी. मुतगेकर, एस. बी. शेडबागी, विठ्ठल देसाई, केशव सांबरेकर, राहुल जाधव, काशी तारिहाळकर, कृष्णा नावगेकर, परशराम जाधव, ज्ञानेश्वर पाटील, हणमंत झंगरुचे, उमाजी मल्लाप्पा, कनगुटकर प्रभाकर, पाटील कडोलकर, यल्लाप्पा मरुचे, कल्लाप्पा पाटील, गोपाळ पाटील, नामदेव डुकरे, यल्लाप्पा गुरव, मुरारी पाटील, जे. के. जाधव, रितेश जाधव, बबन भोबे, गजानन धामणेकरसह संघटनेचे कार्यकर्ते मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीवनी खंडागळे यांनी तर प्रा. निलेश शिंदे यांनी आभार मानले.