ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात सत्ताबदल होताच एकनाथ शिंदे सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला आहे. मेट्रो कारशेड आरेमध्येच बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरे येथे मेट्रोचे कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. तेथे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेचा विरोध असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड होईल, असे निर्देश दिले. मात्र, या जमिनीवर केंद्र सरकारने दावा केला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. भाजपने याला कडाडून विरोध केला होता. यानंतर आता, आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला दिले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा गुंता सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येते.