वार्ताहर/ भुईंज
केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी पांचवड येथे साधला. थेट लाभार्थ्यांशी संवाद घरकुल, उज्वला गॅस, हर घर जल, किसान योजनांचा फायदा होतो का असे प्रश्न विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील समृद्ध देश होण्यासाठी प्रयत्न करूया, असा आशावाद व्यक्त करीत त्यांनी आढावा घेतला.
मंत्री सोम प्रकाश हे रविवारी सातारा जिह्याच्या दौऱयावर आले होते. यावेळी त्यांचे समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेशचे विक्रम पावसकर, माजी आमदार मदनदादा भोसले, अतुलबाबा भोसले, सतीश भोसले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी मंत्री सोमप्रकाश यांनी चर्चा करून महिला बचत गटातील महिलांना काय लाभ मिळाला. पी. एम. किसान योजनेचा लाभ किती शेतकत्यांना मिळाला याचीही माहिती घेतली. यावेळी वाईचे तहसीलदार रणजित भोसले, वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणराव घोलप, महिला व बाल विकास अधिकारी अमर वाघ, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक रंजनकुमार वायदंडे, वाई तालुका व्यवस्थापक सौरभ फरांदे, सागर अभंग, मंडल अधिकारी सचिन जाधव, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब चव्हाण, वैद्यकीय अधिकारी श्याम गिते आदींनी लाभार्थ्यांसह रितसर माहिती दिली.
स्वागत पाचवड ग्रामपंचायतीचे सरपंच अर्चना विसापुरे, उपसरपंच कमलाकर गायकवाड पाटील यांच्यासह सदस्यांनी बुके देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन नितीन विसापुरे यांनी केले.