ऑनलाईन टीम/तरुण भारत
Global Hunger Index 2022 : जागतिक अन्नटंचाई, उपासमारीबाबत नुकताच एक अहवाल समोर आलाय. या अहवालामध्ये कृषिप्रधान भारत उपासमारीच्या संकटात असल्याचं वास्तव समोर आलं आहे. एकीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची घसरण लगातार सुरुच असताना आता जागतिक पातळीवर ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ अहवालानुसार, उपासमार तसंच कुपोषणाबाबत भारताची परिस्थिती गंभीर असल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे. ‘जागतिक भूक निर्देशांक’ अर्थात ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ (Global Hunger Index) अहवालानुसार जगातील १२१ देशांच्या यादीत, भारत (India) १०७ व्या स्थानावर आहे.
दरम्यान, जागतिक अन्नटंचाई, उपासमारीबाबत नुकताच एक अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. जागतिक भूक निर्देशांक यादीमध्ये भारताची १०१ व्या क्रमांकावरून १०७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक दिवाळखोरीत आलेला पाकिस्तान (Pakistan) , श्रीलंका (Sri Lanka) व नेपाळ (Nepal) यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.
२०२१ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारत या यादीत १०१ व्या स्थानावर होता. हे स्थानदेखील भारतातील भूकेसंदर्भातली गंभीर परिस्थिती विशद करण्यासाठी पुरेसं होतं. मात्र, यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे. १२१ देशांमध्ये आता भारत १०७ व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी आहे.