जोवर सूर्य-चंद्र आहे तोवर महामानव , घटनाकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्व आणि आदर्श सूर्याप्रमाणे तळपत राहील असे सांगून त्यांचे विचार अनुसरण केल्यास त्यांना खऱ्या पद्धतीने सम्मान मिळेल असे मत ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.
बाळेकुंद्री खुर्द (ता.बेळगाव) येथे कर्नाटक दलित संघर्ष समिती (भीमवाद) शाखेचे उद्धघाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर फक्त एकाच जाती धर्माला मर्यादित नसून जगाला त्यांनी मानवतेचा संदेश दिला. संपूर्ण जगात श्रेष्ठ असे भारताला संविधान दिले. त्यांनी लिहिलेल्या संविधानाला बदलण्याचा दुःसाहस कुणीही करू नये. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान देशाला मार्गदर्शक आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आंबेडकर भवन निर्माण करण्याची संधी मला लाभली आहे. बाबासाहेबांच्या तत्वांवर केले जात असलेल्या कामांना पाठिंबा देण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी जनतेनी सहकार्य आणि मार्गदर्शन दिले आहे त्यांचे मी आभारी आहे असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी कल्लाप्पा रामचन्नवर, अर्जुन कांबळे, जैनुल कुडची, महादेवी रामचन्नवर, शायबाज शेख, मंगल बागनवर, शांता चंदगडकर, हनुमंत हन्नीकेरी, महेश तंगेनावर व इतर सहभागी झाले होते.