मुख्यमंत्री म्हणतात ‘भिवपाची गरज ना’, मी म्हणतो ‘लजपाची गरज ना’!
गिरीश मांद्रेकर / म्हापसा
मुख्यमंत्री म्हणतात आम्हाला ‘भिवपाची गरज ना’, आपण म्हणतो आम्हाला ‘लजपाची गरज ना’ युवा पिढीने आज शेती व्यवसायाकडे वळणे काळाची गरज आहे. आज मोठ्या प्रमाणात शेतजिमिनी पडीक होत असल्याचे चित्र आहे. शेती व्यवसायाकडे डोळसपणे पाहून पडीक जमिनीत युवापिढीने पूर्वजांच्या पारंपरिक शेती, बागायतीत विविध पिके घेऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असा संदेश कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी दिला.
पर्रा येथे स्वत:ची शेतजमीन तसेच बाजूची जमीन खरेदी करून सुमारे 5 हजार चौ.मी. जमिनीत आमदार मायकल लोबो यांनी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करून शेतमळा फुलवून युवकांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी या शेतमळ्यात कलिंगड, पपई, भेंडी, लालभाजी, मुळे, ज्वारी, अननस, कॅबीज, पालक, मका आदीची लागवड करून शेतात विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. सामाजिक व राजकीय कार्य करत असतानाही आमदार मायकल लोबो आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शेती व्यवसायाकडे लक्ष देतात हे विशेष आहे.
राजकारण सांभाळूनही आपण शेतीकडे लक्ष देतो. यात कसलीही लाज बळगण्याची गरज नाही. आपल्या शेतजमिनीत भाजी किंवा अन्य लागवड करून व्यवसाय करणे यात काहीही गैर नाही किंवा कमीपणा नाही. उलट शेतीकडे युवकांनी उत्स्फूर्तपणे वळावे व स्वत:चा रोजगार निर्माण करावा, असा सल्ला आमदार लोबो यांनी दै. ‘तऊण भारत’शी बोलताना दिला.
पारंपरिक शेती व्यवसायाला उभारी देण्याची गरज!
तुम्ही कितीही कुणीही मोठे अधिकारी व्हा, मात्र तुमच्या शेतात व घरामागील बगीचामध्ये तुम्ही केलेल्या फळे, फूल झाडांना, भाजी लागवडीला पाणी द्या. युवा पिढीनेतर यामध्ये कमीपणा वाटून घेऊ नये. उलट तुमच्या या आगळ्यावेगळया कामाचा दखल समाजासह विविध माध्यमातून घेतली जाते. आपल्या पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्याची गरज आहे.
आपल्या गोव्यात विपुल प्रमाणात लागवडी योग्य शेतजमीन आहे. मात्र 20 टक्केच भाजी लागवड केली जाते. बाहेरील राज्यातून 80 टक्के भाजी आयात केली जाते. या प्रमाणाला फाटा देऊन आपल्या राज्यात 80 टक्के भाजी उत्पादित करण्याची गरज आहे. या संकल्पनेचा युवकांनी बोध घ्यावा. आपल्या शेतजमिनीत राबण्याचा आनंद या वेगळाच असतो, असे अनुभवातून जाणवते, असे लोबो म्हणतात.
तापमान नियंत्रणासाठी उभारले ग्रीननेट
भाजीच्या मळ्यात तापमान नियंत्रणासाठी ग्रीननेट उभालेले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात येणार आह. यासाठी 2 लाख ऊपयांचे कर्ज घेतल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले. लोबो यांना कर्जाची गरज का? असा काहीजण विचार करणार मात्र हे कर्ज उत्पादित केलेली भाजी विकून फेडण्याची तयारी ठेवली पाहिजे. भाजी उत्पादन करून या कर्जाची नक्कीच परतफेड होऊ शकते. युवा पिढीने तशी तयारी दाखविण्याची गरज आहे. यासाठी त्यांना सरकारकडून मदतीची गरज असल्याचे मत त्यांना व्यक्त केले.
भातशेती, भाजी लागवड हे गोमंतकीयांचे पारंपरिक व्यवसाय आहेत. आमच्या लाहानपणीपूर्वी पोरसू लावण्यासाठी शेतात तात्पुरता ख•ा खोदून भाजी अन्य नागली पिकांसाठी पाण्याचा वापर केला जात असे. तात्र पावसाळ्यापूर्वी तो खड्डा बुजवावा लागत असे. यामध्ये भेंडी, वांगी, कलिंगड, मुळे, तांबडी भाजी, ढबू मिरची तसेच लाल मिरची आदींचे उत्पादन होत असे.
सध्या स्वत: पिकविलेला उकडा तांदूळ जेवणात वापरतो!
पर्रा येथील पाच हजार चौ.मी. जमिनीत भातशेती घेण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात बाजारातील सुरय तांदूळ खात होतो. आता पुन्हा पारंपरिक भातशेती लागवड सुरू केली आहे. ‘उकडे’ तांदूळ लावण्यास सुऊवात केली आणि आज आम्ही जेवण्यात वापरत आहोत. याशिवाय गेल्यावर्षी भात विकून दीड लाखाचा फायदा मिळाला. तसेच आमच्या शेतात पिकलेला भाजपाला फळे आमच्या रेस्टॉरंटमध्ये दिला जातो. अशी माहिती आमदार लोबो यांनी पुढे बोलताना दिली.
विक्रीकेंद्र सुरू करण्याची योजना!
राज्यातील युवकांनी शेती व्यवसयात रस घेऊन भातशेती किंवा फळांचे उत्पादन केल्यास त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पर्रा, हडफडे नागवा येथे विक्री केंद्र सुरू करण्याची योजना असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.
भाजी लागवडीसाठी 100 टक्के अनुदान द्यावे!
आज अनेकांनी आपली शेती व्यवसाय सोडला आहे. गेली 30 वर्षापासून आपण पाहत आलो आहे शेती व्यवसाय कमी होत चालला आहे. शेती व्यवसयात मोठा आर्थिक लाभ होत नाही असा आजच्या पिढीच समज आहे. मात्र उलट काबाडकष्ट केल्यास शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात फायदा आहे. यासाठी पुढाकार घेण्यास सर्व पंचायती, एनजीओ सकारात्मक विचार घेऊन येणाऱ्यांनी युवा पिढीला याबाबत शेती व्यवसाय करण्यास प्रोत्साहन द्यावे असे ते म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे काळाची गरज आहे. 100 टक्के सरकार मदत केल्यास शेती लागवड मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंकाच नाही.