ऑनलाईन टीम/तरुण भारत
वेदांत-फॉक्सकॉननंतर (Vedant-Foxconn) आता टाटा एअरबस (TaTa Airbus) प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी शिंदे सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावरून आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला आहे.
दरम्यान, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे सरकारवर (Shinde Government) टीका केली. “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही.” असे ते म्हणाले होते. त्यावरून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा करत प्रत्युत्तर दिले. तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खोचक टीकेला आमदार आणि ठाकरे गटातील नेते सुनील राऊत यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरे यांचा बाप आहे, हे लवकरच यांना दिसून येईल”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला
“महाराष्ट्रात आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला शिंदे-फडणवीसांचे युती सरकार घाबरलं आहे”, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, “मी त्यांच्यासोबत बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना जे त्यांनी विचारलं ते मी करत नसल्यानं त्यांना वाईट वाटलं आहे” असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी सत्तारांना दिले आहे. पीक पाहणी दौऱ्यादरम्यान अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला होता. यावरुन ठाकरेंनी सत्तारांना टोला लगावला आहे.