ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधानपरिषद निवडणुकीत मतदानाला एक दिवसांचा जामीन मिळावा यासाठी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (navab malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी उच्च न्यायालयात (high court) याचिका दाखल केली होती. यावर न्यायालय आज निकाल देणार होतं. पण ही सुनावणी पुढं ढकलली असून १६ जून २०२२ रोजी होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मलिक आणि देशमुखांना मतदान करू न दिल्याने शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला होता.
नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर १६ जून २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये मतादनाची परवानगी दिली नव्हती यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. हायकोर्टात या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्यात यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. दोघांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी करण्यात येत आहे. परंतु आजच्या कोर्टाच्या कामकाजात सुनावणी होईल असे वाटत नाही यामुळे सुनावणी उद्यावर जाणार आहे. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी सकाळीच घेण्यात यावी असे निर्देश न्यायमूर्ती एन. जमादार यांनी दिले आहेत.