बेळगाव : एखाद्या चित्रपटाची पटकथा शोभेल अशा पद्धतीने बेळगावमध्ये एक घटना घडली. वाहनात हरवलेले पैसे नाट्यामयरित्या परत मिळाले. एका रिक्षाचालकांने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे वयस्कर आजीला तिचे एक दोन नव्हे तर दीड लाख रुपये परत देण्यात आले. त्यामुळे रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. चार दिवसांपूर्वी एसपीएम रोडवर तिम्मापूर धारवाड येथील मिरचीच्या व्यापारी यल्लव्वा नागराळ रिक्षामध्ये चढल्या. वाटेमध्ये काही वस्तु खरेदी करण्यासाठी त्या उतरल्या होत्या. पैसे देवून पुन्हा रिक्षात चढताना त्यांची पैशाची बॅग रिक्षात पडली. किल्ला येथे रिक्षातून उतरून त्या धारवाडला रवाना झाल्या. वाटेत असताना बॅग आपल्याकडे नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर शोधमोहीम सुरू केली. यल्लव्वा यांच्यासोबत त्यांचा भाचाही सोबत होता. त्याने रिक्षाचा क्रमांक लक्षात ठेवला होता. त्यामुळे बेळगावमध्ये येवून शोधमोहीम सुरू केली. संगमेश्वरनगर येथील रिक्षाचालक रियाज अहमद वडगावकर यांना पोलिसांचा फोन आला. पोलीस स्थानकात आल्यानंतर त्यांना आपल्या रिक्षात पैशांची बॅग पडली आहे, हे सांगण्यात आले. त्यानंतर केलेल्या शोधमोहिमेमध्ये ऑटोरिक्षाच्या एका कोपऱ्यात बॅग सापडली. रियाज अहमद वडगावकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे यल्लव्वा या गरीब महिलेची बॅग परत मिळाली. या बॅगमध्ये असणारी दिड लाख रुपयांची रोकड यल्लव्वा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यल्लव्वा यांनी रियाज यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. आजही समाजात प्रामाणिकपणा जीवंत आहे हे या उदाहरणातून समजून येते.
Previous Articleअंगणवाडी सेविकांवर समीक्षा सर्व्हेचा बोजा
Next Article संभाजी महाराजांना शिवसेनेतर्फे अभिवादन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.