दादा भुसे यांनी अॅग्रो कंपऩीच्या नावाने शेअर्स गोळा करून त्यात अपहार केल्याचा आरोप खासदार संजय राउत यांनी केला होता. त्याला उत्तर देताना कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी संजय राउत हे शिवसेनेचे खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांची खातात असे वक्तव्य केले. भुसेंच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात एकच गोंधळ घातला तर विरोधी पक्षनेते अजित पवार अधिक आक्रमक होत आपल्या पक्षाच्या अध्यक्षांवर कोणालाही बोलणा्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवर राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्य़ावर गंभिर आरोप करून गिरणा अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी “मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल,” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राउत यांच्या या आरोपावर विधानसभेत प्रत्युत्तर देताना दादा भुसे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून गेले आहेत. कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. जर यात मी दोषी आढळलो, तर आमदारकी आणि मंत्रीपदाचा राजीनामा देतो. जर यात खोट आढळून आलं, तर या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय पवार हे ‘मातोश्री’ची भाकरी खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. संजय राऊतांनी मालेगावच्या नागरिकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. २६ मार्चपर्यंत माफी मागितली नाही, तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा दादा भुसे यांनी दिला.
मंत्री दादा भुसे यांनी थेट शरद पवार यांचा उल्लेख केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे आमदार आणि सभागृहाचे विऱोधीपक्षनेते अजित पवार यांनी यावर आक्षेप घेतला. आक्रमक होताना अजित पार म्हणाले “तुम्हाला जे मत मांडायचं ते मांडा. पण, आमच्या पक्षाच्या प्रमुखांचं नाव घेण्याची गरज नाही. दादा भुसेंनी जे सभागृहात म्हटलं, ते रेकॉर्डवरून काढण्यात यावं,” अशी मागणीही अजित पवारांनी केली.