करमळी : करमळी येथे स्थायिक झालेले नाईक भाटकर घराणे मूळ अंत्रुज महालातील कुंकळ्यो या गावातील. शंकर नाईक हे या घराण्यातील कर्ते पुऊष होऊन गेले. त्यांचे सुपुत्र अनंत, वासुदेव, कृष्णा, विष्णू, वैकुंठ व गोविंद हे आपापल्या क्षेत्रात यशस्वी व सुप्रसिद्ध होते. त्या काळातही घरातील सर्वांनी उच्च शिक्षण घेतले होते. असे हे सुशिक्षित घराणे म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या घराण्यात पूर्वापार अशी श्रीकृष्णाची पूजा चालत आलेली आहे. ही कृष्णाची मूर्ती चतुर्भुज असून शंख-चक्र-गदा पद्मधारी आहे. ही पूजा भाद्रपद शुक्ल दुर्गाष्टमी दिवशी केले जाते. पोर्तुगीज राजवटीत काही कारणांमुळे सर्व कुटुंबीय करमळी गावात स्थायिक झाले आणि मूर्ती मात्र मूळ गावात ठेवली गेली. काही वर्षांनी मूळ घर कोसळले, मूर्ती शोधूनही सापडली नाही. गणेश चतुर्थीच्या काही दिवस अगोदर घरातील एका कर्त्या पुऊषाच्या स्वप्नात श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला आणि मूर्तीचे ठिकाण समजून आले. श्रीकृष्णाची मूर्ती जागच्या जागी पाटावर तशीच्यातशी उभी होती. सर्व कुटुंबियांनी मूर्ती मानाने करमळीच्या घरात स्थापन केली. गणपती विसर्जनानंतर त्याच स्थानावर दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजे तिथीप्रमाणे, चतुर्थीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ही पूजा थाटामाटात साजरी होते. दुपारी महाप्रसाद झाल्यावर पूर्ण मूर्ती व गाभारा जायांच्या फुलांनी सजविला जातो. गेल्या दोनशे वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. या मूर्तीसमोर दंडवत घालणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Previous Articleशेतकऱ्यांनी खोड किड्यांपासून काजू पिकाचे रक्षण करावे
Next Article अथर्वशिर्ष पठण करा, सर्व संकटे दूर होतील
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment