ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संपली, त्याच पद्धतीने येत्या काळात राष्ट्रवादी आणि काँगेस हे पक्षही संपतील, असे खळबळजनक वक्तव्य माढय़ाचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (RanjitSingh Nimbalkar) यांनी केले आहे.
माढय़ात मीडियाशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहणारे अनेक मुंगेरीलाल आहेत. स्वप्न पाहणं हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी पक्षाचे नावही राहिले नाही आणि पक्षचिन्हही गेलं. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी, काँग्रेसचा नंबर असेल. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्षच शिल्लक राहणार नसल्याने मुख्यमंत्री काय, इतर कोणतेही मंत्रीपद त्यांना मिळणार नाही. पक्ष जिवंत राहावा, यासाठी त्यांची आता शेवटची धडपड सुरू आहे, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा : ‘ती मी नव्हेच’; EVM च्या फोटोवर रुपाली पाटील यांचे स्पष्टीकरण